पुणे – पूर्ववैमनस्यातून कोयते आणि पालघन या हत्यारांनी वार करून आणि दगडांनी मारून खून केल्याप्रकरणात एकाचा जामीन मोक्का न्यायालयाने फेटाळला. तर एकाला जामीन मंजुर करण्यात आला आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी हा आदेश दिला आहे.
अर्जून दशरथ म्हस्के याचा जामीन फेटाळला. तर रिपन्स रॉबर्ट चिन्नाप्पा याला जामीन मंजुर झाला आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी बाजू मांडली. तर, चिन्नाप्पा याच्या वतीने ऍड. सुरेश जाधव, ऍड. मतीन शेख आणि ऍड. मनिषा खावडे यांनी युक्तीवाद केला.
चिन्नाप्पा याचे नाव एफआयआरमध्ये नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. त्याच्याकडून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली. नितीन शिवाजी कसबे (वय 24, रा. येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे.
पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चौघांवर हल्ला करण्यात आला. नागेश कांबळे याने याबाबत येरवडा पोलिसात फिर्याद दिली आहे. मेहुण्याचा वाढदिवस होता. तो मयत झालेल्या ठिकाणी चौघे नेवेद्य दाखविण्यासाठी गेले होते.
तेथे पंधराहून अधिक त्यांच्यावर हल्ला करण्यास गेले. चौघे जण दिसेल तिकडे पळून गेले. यामध्ये फिर्यादेसोबत असलेल्या नितीन याचा खून करण्यात आला. या प्रकरणात मोक्का लावण्यात होता. त्यामध्ये दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता.