पुणे – प्रभागाच्या विकासासाठी लक्ष केंद्रीत केलेल्या नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे काम कौतुकास्पद असून मतदार आगामी निवडणूकीत त्यांना पुन्हा नगरसेविका म्हणून निवडून पाठवितील असा विश्वास माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 19 च्या नगरसेविका अर्चना पाटील यांच्या प्रभागात एकाच दिवशी सुमारे 3 कोटींच्या 21 विकासकामांचे भूमीपूजन माजी आमदार कांबळे तसेच भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील सुनील कांबळे , सुखदेव अडागळे, सनी अडागळे, विकी ढोले, दिनेश रासकर, मुनावर रामपुरी, रेहमान शेख, आशिष झांझोत, संध्या पवार, परवीन तांबोळी, राईस शेख, पुष्पक चव्हाण, मनीषा गायकवाड तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगदीश मुळीक म्हणाले, एकाच दिवसामध्ये तब्बल 21 कामाचे भूमपूजन होतंय, याबद्दल मी अर्चना पाटील आणि तुषार पाटील यांचे अभिनंदन करतो. त्यांनी कॉंग्रेस सारखा गाजावाजा न करता कामाला महत्त्व दिलाय. कारण त्यांच्या त्यांच्या मनामध्ये आणि विचारा मध्ये प्रभागाचा विकास हा एकाच ध्यास आहे.
तर ” तुम्ही दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. तुमच्या विश्वसामुळे प्रभागाचा विकास करू शकले. तुम्हाला दिलेले वचन पूर्ण करताना खूप जास्त समाधान वाटतय. आता प्रभागाच्या विकासावर काम केले आणि ते करत राहणार पण इथून पुढे प्रभागातील प्रत्येक महिला आणि आणि तरुण वर्ग सक्षम करण्यासाठी मला काम करायचं असल्याचे मनोगत यावेळी नगरसेविका पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन बंडू चरण यांनी केले.