पुणे – मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटली आहे. मात्र, त्या तुलनेने मागणी कमी असल्याने आले, लसूण, मटार आणि पावट्याच्या भावात घट झाली.
आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने शेवग्याचे भाव कडाडले असून, सिमला मिरचीच्या भावातही वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
येथील बाजारात रविवारी (दि. 28) 80 ते 90 ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश येथून एक टन शेवगा, राजस्थान येथून 7 ते 8 टेंम्पो गाजर, मध्यप्रदेश येथून 7 ट्रक आणि पंजाबमधून एक ट्रक अशी एकूण आठ ट्रक मटार आणि गुजरात, मध्य प्रदेश येथून लसणाची 10 ते 12 ट्रक इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल.े सुमारे 2 हजार पोती, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 7 ते 8 टेम्पो, टोमॅटो सात ते आठ हजार क्रेटस, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, स्थानिक मटार 40 ते 50 गोणी, भुईमूग शेंग 40 ते 50 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 70 ते 75 ट्रक, आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून मिळून बटाटा 40 ते 45 ट्रक इतकी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यानी दिली.
फळभाज्यांचे 10 किलोचे भाव
कांदा : 150-220, बटाटा : 150-200, लसूण : 250-350, आले : सातारी : 100-200, भेंडी : 300-400, गवार :400-600, टोमॅटो : 300-400, दोडका : 250-350, हिरवी मिरची : 150-250, दुधी भोपळा: 100-150, चवळी: 200- 250, काकडी : 200-250, कारली हिरवी 200-250, पांढरी 180-200, पापडी : 150-200, पडवळ: 150-200, फ्लॉवर: 100-140, कोबी : 100-150, वांगी : 150-250, डिंगरी : 200- 250, नवलकोल: 200-250, ढोबळी मिरची : 250-550, तोंडली : कळी 350-400, जाड, 180-200, शेवगा: 2000, गाजर 250-300, वालवर 150-200, बीट : 150-200, घेवडा : 500-600, कोहळा : 100-150, आर्वी : 250-300, घोसावळे : 150-200, ढेमसे: 200-250, भुईमूग शेग : 350-450, मटार : 500-650, पावटा : 200-300, तांबडा भोपळा: 60-100, सुरण : 180-200, मका कणीस : 50-100, नारळ : शेकडा 1000-1600 याप्रमाणे भाव राहिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.