पुणे(प्रतिनिधी) – उच्च दांपत्याने परस्पर संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा अवघ्या 21 दिवसात कौटुंबिक न्यायालयाने मंजुर केला आहे. दावा दाखल केल्यापासून घटस्फोटासाठी सहा महिन्याचा कालावधी लागत असतो. मात्र, दोघे सुमारे दीड वर्षांपासून विभक्त राहत आहेत. आता सहा माहिने थांबणे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्याच्या आधारे वकिलांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. त्यानुसार हा कालावधी वगळून प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा निकाल दिला.
माधव आणि माधवी (अशी त्या दोघांची नावे आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. तो आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. तर ती डॉक्टर आहे. दोघांचे पारंपारिक पध्दतीने पाहणी करून (ऍरेंज मॅरेज) लग्न झाले आहे.
दोघामध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाल्याने ते जुलै 2019 पासून विभक्त राहत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात ॲड. प्रणयकुमार लंजिले, ॲड. अनिकेत डांगे आणि ॲड. लक्ष्मण सावंत यांच्यामार्फत दावा दाखल केला.
6 जुलै रोजी रजिस्टर झालेला दावा 26 जुलै रोजी न्यायालयाने मंजुर केला. तो बाहेरगावी असतो. तर ती पुण्यात असते. दोघांना तीन वर्षाचा मुलगा असून, तो तिच्याकडेच राहणार आहे.