पुणे( प्रतिनिधी) – बाजार समिती प्रशासनाने टेम्पो चालकांकडून होणाऱ्या अवैध वसुलीला विरोध आणि कामगार संघटनांच्या कार्यालयानांना भाडे आकारणीच्या विरोधात कामगार संघटनांनी बंद पुकारला होता.
मात्र करोना संकटासारख्या आपत्कालीन परिस्थितीत शेतकरी आणि इतर बाजार घटक अडचणीत असताना बाजार समिती बंद ठेवणे योग्य नाही. अशी समज पोलीस आणि बाजार समिती प्रशासनाने दिल्यानंतर बंद मागे घेण्यात आला आहे.
समन्वय समितीच्या बैठकीत ठरल्यानंतर सोमवार (ता.३१) व्यवहार सुरळीत राहणार आहेत.
बाजार समिती आवारात भाजीपाला खरेदीदार वाहन चालकांकडून काही कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून शेतमाल लावणे, वाहने लावणे वाहनांची देखरेख करणे या नावाखाली १०० ते २०० रुपये आकारण्यात येत असल्याचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकारे होणारी बेकायदा वसुली आळा घालण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.
नव्या नियमानुसार बाजार समिती प्रशासन अधिकृतरीत्या ५० रुपये शुल्क आकारणी करणार होती. मात्र या निर्णयाला कामगार संघटनांनी विरोध केला होता.