पुणे – शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या मार्गावरील 12 मीटर लांबीच्या बसचा मार्ग बदलण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. या मार्गावर आता “पुण्यदशम’च्या 9 मीटर लांबीच्या बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, या बसेसच्या माध्यमातून पीएमपीकडून मोटार वाहन कायद्यालाच हरताळ फासला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या बसची बसणाऱ्या प्रवाशांची क्षमता 26 असून केवळ सहाच प्रवासी उभे राहू शकतात. मात्र, प्रत्यक्षात मोठ्या बसेस बंद केल्याने अक्षरश: प्रवाशांना कोंबून या बस धावत आहेत. त्यामुळे हा प्रकार थांबविण्याची मागणी सजग प्रवासी करत आहेत. बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यांवरून जाणाऱ्या 12 मार्गांवरील सुमारे 42 बसेसचा मार्ग बदलला आहे.
त्यामुळे 12 मीटर बसच्या 536 फेऱ्या या रस्त्यावरून कमी झालेल्या आहेत. तर प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी शिवाजीनगर ते स्वारगेट मार्गावर पुण्यादशमच्या 24 बसेस सोडण्यात येणार असून त्याच्या 768 फेऱ्यांचे नियोजन आहे. मात्र, या बसेस लहान असल्याने या मार्गावर असलेल्या प्रवाशांची वेळ गाठण्यासाठी झुंबड उडत असून उभे राहणाऱ्या प्रवाशांची संख्या 6 पेक्षा तीन ते चारपट आहे.
“डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी ममता बॅनर्जी मंत्रिमंडळाबरोबरच पक्ष संघटनेत व्यापक फेरबदल करणार?
मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनाची प्रवासी क्षमता निश्चित करून देण्यात आलेली आहे. पीएमपीने माहिती अधिकारात मला स्वत:ला ही माहिती दिली आहे. त्यानुसार पुण्यदशम बसमध्ये 25 जण बसू शकतात. तर, 6 जण उभे राहू शकतात. मात्र, अचानक मोठ्या बस बंद झाल्याने आता त्यामध्ये 50 पेक्षा जास्त प्रवासी वेळ गाठण्यासाठी प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक त्रास सहन करावे लागत असून, हा प्रकार न थांबविल्यास आरटीओकडे तक्रार करू.
– निळकंठ मांढरे ( पीएमपी प्रवासी )
चकमकीत दहशतवादी ठार; दोन जवान जखमी