पुणे – शहरात संचारबंदी असूनही विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावर गर्दी दिसत आहे. पोलिसांकडून वारंवार सांगूनही नागरीक रस्त्यांवर फिरणे थांबवित नसल्याची सद्यस्थिती आहे.
या प्रकाराची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे आता कोणत्याही कारणाशिवाय शहरामध्ये कोणी फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईबरोबरच पोलिसांकडून योग्य तो “पाहूणचार’ केला जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.