अख्खा संसारचं ओढ्याने गिळला
साधारण 500 उंबऱ्यांच्या या वसाहतीला बुधवारच्या पावसाचा तडाखा बसला. आंबील ओढ्याला अगदी लागून असलेल्या या घरांत गुडघाभर पाणी गुरुवारी दुपारपर्यंत होते. गॅस सिलिंडर, भांडी-कुंडी, टीव्ही, पलंग, घरगुती साहित्य, कपडे असं सगळंच ओढ्यानं गिळलं तिथं लेकरांच्या वही पुस्तकांची काय बात? दरम्यान, हे रहिवासी शासकीय यंत्रणेकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत असून तातडीने पंचनामा करण्याची मागणी होत आहे.
आभाळच फाटलंय दादा..कुठं कुठं भांडं लावू..
साडेनऊ-दहा वाजले असतील.. कोणाच्या घरात जेवणाची तर कोणाच्या घरात झोपण्याची तयारी सुरू असताना अचानक पाण्याचा मोठा प्रवाह धडकला आणि काहीच वेळात घर पाण्यात बुडालं.. हाती लागले ते घेऊन जीव वाचवताना रात्रभर उघड्यावर काढली.. आता लेकरांना घास कुठून भरवायचा? आजचा रोजगार बुडाला.. सकाळपासून पोटात पाण्याचा थेंब नाही, आता जगायचं कसं? अशा व्यथा आंबील ओढा आझादनगर येथील रहिवाश्यांनी मांडल्या.
अग्निशमनच्या जवानांनी चिमुकल्याला वाचविले; थरार कॅमेऱ्यात कैद
बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि काही क्षणांतच पावसाने रौद्र रूप धारण केले. या पावसाने शहरासह उपनगरांत मोठे नुकसान केले. यात अनेक घरांत पाणी शिरले होते. मित्रमंडळ चौक येथे पाण्यात अडकलेल्या बाळाला वाचविण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी कर्तव्य तत्परतेने बाळाला सुखरूप बाहेर काढले.
पावसाचा जोर पुन्हा वाढणार?
बंगालचा उपसागर आणि आंध्रप्रदेश दक्षिण भाग ते तामिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे आता राज्यात आगामी दोन दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाऊस थांबल्यानंतरही ड्रेनेज ओव्हर फ्लो
गेल्या दोन दिवसांपासून शहरात जोरदार हजेरी लावलेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. मात्र, पाऊस थांबल्यानंतर 10 तासानंतरही शहराच्या विविध भागांमधील अनेक ठिकाणची ड्रेनेज ओव्हर फ्लो होऊन वाहत होती. या ड्रेनेजमधील पाणी रस्त्यांवरुन वाहत असल्याने पादचाऱ्यांबरोबरच वाहनचालकांना त्रास सहन कारावा लागत आहे.
#फोटो : पुण्यात पावसाचे तांडव
शहरात बुधवारी रात्री अचानक पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, काही ठिकाणी लोक पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच पाण्याच्या प्रवाहात शहरातील अनेक भागात शेकडो वाहने वाहून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाल्याचे पहायला मिळत आहे.
सासवड-जेजुरी रस्त्यावरील पूल खचला; धीम्या गतीने वाहतूक सुरू
मंगळवारी रात्री झोडपल्यानंतर बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि काही क्षणांतच पावसाने रौद्र रूप धारण केले. या पावसाने शहरासह उपनगरांत मोठे नुकसान केले. यात अनेक घरांत पाणी शिरले असून रस्तेदेखील बंद करण्यात आले.
पावसाचा हाहाकार; पुण्यात 5 जणांचा मृत्यू
मंगळवारी रात्री झोडपल्यानंतर बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि काही क्षणांतच पावसाने रौद्र रूप धारण केले. या पावसाने शहरासह उपनगरांत मोठे नुकसान केले. यात अनेक घरांत पाणी शिरले असून रस्तेदेखील बंद करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे 5 तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर
बुधवारी शहरात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये म्हणून जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने मोटार नादुरूस्त; पाणीपुरवठा बंद
मंगळवारी रात्री झोडपल्यानंतर बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, रात्री 9च्या सुमारास तुफानी पावसाने पुणेकरांना जेरीस आणले. नॉनस्टॉप सुरू असलेल्या या पावसाने शहरासह उपनगरांत मोठे नुकसान केले. यात अनेक घरांत पाणी शिरले असून रस्तेदेखील बंद करण्यात आले. तसेच पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने सर्व पंप आणि मोटार नादुरूस्त झाले आहेत.
पावसाचा कहर! पुणे शहर, उपनगरांना अक्षरश: धुतले
मंगळवारी रात्री झोडपल्यानंतर बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, रात्री 9च्या सुमारास तुफानी पावसाने पुणेकरांना जेरीस आणले. नॉनस्टॉप सुरू असलेल्या या पावसाने शहरासह उपनगरांत मोठे नुकसान केले. यात अनेक घरांत पाणी शिरले असून रस्तेदेखील बंद करण्यात आले.
बारामतीत कर्हेला पूर; 23 हजार जणांचे स्थलांतर
पुरंदर तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे कर्हा नदीला पूर आला आहे. पुण्यासह पुरंदर तालुक्याला देखील पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे तालुक्यातील नाझरे धरण भरले आहे. त्यामुळे नाझरे धरणातून कर्हा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आतापर्यंत 85 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.आतापर्यंत बारामती तालुक्यातील 15 हजार, बारामती शहरातील 6 हजार 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.