पुणे – दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेकडून विविध भागांत जादा गाड्या सोडण्यात येत होत्या. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे त्यांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. तर, पुणे-जयपूर-पुणे या गाडीच्या वेळात बदल केला आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून जयपूर आणि जबलपूरदरम्यान विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. पुणे-जयपूर गाडी 30 डिसेंबरपर्यंत धावणार असून, दर बुधवारी आणि रविवारी सायंकाळी 5.30 वाजता सुटणार आहे.
जयपूरहून 29 डिसेंबरपर्यंत गाडी धावणार असून, दर मंगळवार आणि शनिवारी दुपारी 12.20 वाजता सुटणार आहे. यासह पुणे-जबलपूर ही गाडी 29 डिसेंबरपर्यंत आणि जबलपूर-पुणे गाडी 28 डिसेंबरपर्यंत धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.