पुणे- महापालिका हद्दीलगतच्या गावांत बोगस कर्मचारी भरती करण्यात आली. याबाबत चौकशी समितीने दिलेल्या अहवालात काही निरीक्षणे नोंदविली आहेत.
आवश्यक कर्मचाऱ्याची उपयुक्तता, कामाची विभागणी त्याचा विचार ग्रामपंचायतीने केला नाही. गरजेनुसारच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायला हवी. आवश्यकता नसताना कर्मचारी नेमू नये अशा शब्दांत समितीने ताशेरे ओढले आहे. बोगस भरती कर्मचाऱ्यांच्या वेतनाची तरतूद ग्रामपंचायत अंदाजपत्रकात केली नाही.
तसेच शैक्षणिक पात्रता, वयाचा विचार न करता मनमानी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही समितीने अहवालात म्हटले आहे. लोकवर्गणीची रक्कम कोणाकडून घेतली याच्या नावाचा ग्रामपंचायत दफ्तरात उल्लेख नाही, याकडे समितीने लक्ष वेधले आहे.