वाघोली – आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्र. 2 मधील नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी जनता पाठीशी असून त्यांची मोलाची साथ लाभत असल्याचे उमेदवार अविनाश बापूसाहेब सातव पाटील, आरती अक्षय सातव, सुजाता सचिन सातव यांनी सांगितले.
आव्हाळवाडी तालुका हवेली येथील येथील वॉर्ड क्र. 2 मधील अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन तसेच इतर समस्या या सोडवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी युवक वर्गावर विश्वास ठेवून जनतेची सेवा करण्यासाठी सर्वानुमते उमेदवारीची संधी दिली असल्याचे अविनाश सातव पाटील यांनी सांगितले.
आव्हाळवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत वॉर्ड क्रमांक दोनमध्ये होत असलेल्या निवडणुकीत गृहभेटी, पदयात्रा या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना उमेदवार अविनाश सातव पाटील, आरती सातव, सुजाता सातव यांना उत्तम प्रतिसाद लाभत असून मतदारांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
विकासाभिमुख निर्णय घेण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे अविनाश सातव पाटील, आरती सातव, सुजाता सातव यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केल्याने जनतेचा मोठा पाठिंबा या तीन उमेदवारांना मिळत असल्याची चर्चा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. वॉर्ड क्रमांक दोनमधील सर्व सामान्य मतदार बंधू-भगिनींनी आजपर्यंतच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये एकजुटीचा इतिहास निर्माण केला आहे
हीच नागरिकांची एकजूट मोठी ताकद आणि सबळ साथ बनली असल्याचे अविनाश सातव पाटील व इतर यांनी सांगितले. जनतेच्या पाठिंब्याने व अनमोल साथीने या निवडणुकीत विजय भरघोस मतांनी मिळेल, असा विश्वास या तिघांनी व्यक्त केला आहे.
वॉर्ड क्रमांक दोनमध्ये प्रचाराची सांगता जाहीर सभा डोमखेल वस्ती येथे मोठ्या उत्साहात पार पडली. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या अविनाश सातव व इतर यांनी सामान्य मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आगामी काळातील विकासकामांसाठी दिलेला शब्द आता चर्चेला आला असून निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा वाढवणारा ठरू लागला आहे.