नारायणगाव -शिवजन्मभूमी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यात शासकीय कार्यक्रमात पोलिसांबरोबर माजी सैनिकांना मानवंदना करण्याची संधी मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी म्हटले आहे.
नारायणगाव येथे जुन्नर तालुक्यातील माजी सैनिकांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार बेनके बोलत होते. याप्रसंगी ग्रुप कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत मंडलिक (निवृत्त), कॅप्टन सुहास पाठक निवृत्त), कर्नल तान्हाजी अरबूज(निवृत्त), विंग कमांडर एस, केळकर (निवृत्त), नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके, कृषिभूषण अनिल मेहेर,
उपसरपंच आरिफ आतार, संतोष वाजगे, संतोष दांगट, राजश्री बोरकर, प्रकाश पाटे, कॅप्टन महादेव हाडवळे, लेफ्टनंट उमेश अवचट, विठ्ठल खांडगे, सुधीर खेबडे, चंद्रकांत जाधव, रमेश खरमाळे, ज्ञानदेव थोरवे, महादेव हाडवळे, रामदास मेहेर,दिलीप आरोटे, नवनाथ गाढवे, राजेंद्र काळे मान्यवर उपस्थित होते.
सरपंच पाटे म्हणाले की, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात माजी सैनिकांनी कार्यालयाची केलेले मागणी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण होत आहे. माजी सैनिकांना कार्यालय उपलब्ध करून देणे कर्तव्य समजतो. देश सेवेसाठी कार्य केलेल्या जुन्नर तालुक्यातील माजी सैनिकांच्या ऋणातून थोडेफार उतराई होण्याची संधी प्राप्त झाली हे भाग्य समजतो. नारायणगाव भूमी नेहमीच सैनिकांच्या पाठीशी उभी आहे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाची प्रस्तावना देविदास भुजबळ यांनी