नायगाव -पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एक वर्षांपासून एकच शिक्षिका असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने कोणी शिक्षक देता का शिक्षक अशी आर्तहाक नायगावच्या ग्रास्थांनी दिली आहे.
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांवर 26 शिक्षक कमी असल्याचे गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत उगले यांनी सांगितले. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी मोठे नुकसान होत आहे. काही ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंत एकच शिक्षक असून विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एक वर्षांपासून एकच शिक्षिका असून काही पालकांनी आपली मुले दुसऱ्या शाळेत घातली आहेत. त्यामुळे नायगाव येथील विद्यार्थी संख्या कमी होऊ लागली आहे. नायगाव ग्रामस्थांनी मंत्रालय, जिल्हा परिषद,पंचायत समिती येथील अधिकाऱ्यांशी अनेकवेळा तोंडी व लेखी मागणी केली आहे;
परंतु आजपर्यंत शिक्षक मिळाळा नाही.पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनेक दिवसांपासून पहिली ते चौथी पर्यंत एकच शिक्षिका असून इतर शिक्षक त्वरित भरावेत व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यावी. शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावेत, या मागणीकडे शिक्षण विभागाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यात 26 शिक्षक कमी कोण घेणार विद्यार्थ्यांची हमी आशी चर्चा नागरिकांनामध्ये आहे.