जिल्हा परिषद अध्यक्षा पानसरे यांच्या पाठपुराव्यातून आमदार मोहिते यांनी दिला निधी
राजगुरूनगर – स्वातंत्र्यापासून प्रलंबित असलेल्या वाकळवाडी-गोसासी रस्त्याच्या कामासाठी निधी देताना मनापासून समाधान होत आहे, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या पाठपुराव्यातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून निधीपासून प्रतीक्षेत राहिलेल्या वाकळवाडी-गोसासी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एक कोटी सात लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्याचे भूमिपूजन आमदार मोहिते पाटील, निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राम महाराज रोडे, ऍड. सुखदेव पानसरे, श्रीरंग चौधरी, विठ्ठल ढेरंगे, सरपंच मंगल कोरडे, सदस्य शिवराज्ञी पवळे, रुपाली पवळे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन कचरु पवळे, योगेश पवळे, ऍड. सचिन पवळे, दिलीप सुके, भिकाजी ढेरंगे, सतिश पवळे, दत्ताभाऊ ढेरंगे, पांडुरंग पवळे, पांडुरंग कोरडे, दिलीप पवळे, गोरक्ष पवळे आप्पासाहेब गोरडे, ऍड. दीपक पवळे, संदेश तांबे उपस्थित होते.
आमदार मोहिते पाटील म्हणाले, स्वातंत्र्यापासून प्रलंबित असलेल्या वाकळवाडी-गोसासी रस्त्याच्या कामासाठी निधी देताना समाधान होत आहे, यावेळी सीएपदी निवड झालेली शीतल कोरडे आणि कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमामध्ये नेत्रदिपक कामगिरी केलेली गायिका प्रियांका ढेरंगे-चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक नेते धर्मराज पवळे यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र पवळे यांनी आभार मानले.
विविध 29 विकासकामांचा शुभारंभ
आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या हस्ते वाकळवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गतनाळ पाणी पुरवठा योजना करणे, गोसासी- वाकळवाडी रस्ता प्रजिमा 69 रस्ता करणे, ग्रामपंचायत इमारत उदघाटनसह गावातील विविध 29 विकासकामांचा शुभारंभ व काही पूर्ण कामांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार मोहिते यांच्या माध्यमातून मिळालेल्या अध्यक्षपदामुळे या भागाचा विकास साधता आला. मतदारसंघात आणि तालुक्यात कोट्यवधींची विकासकामे करता आली. आता नागरिकांनी अण्णांच्या पाठीशी ठामपणे उभी राहण्याची भूमिका घ्यायला हवी.
-निर्मलाताई पानसरे, अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे