भिगवण – ही निवडणूक लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने व अदृश्य शक्तीच्या मदतीने चाललेली दडपशाही वेळीच रोखण्यासाठी महत्वाची आहे. शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे आहे, असे महारुद्र पाटील यांनी बोलताना सांगितले.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सुरुवात येथील भैरवनाथ मंदिरामध्ये नारळ वाढवून करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते, तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, बाळासाहेब चितळकर, दादासाहेब थोरात,
आप्पासाहेब गायकवाड, रमेश धवडे, राजु भिसे, केशव भापकर, शशिकांत काटे, लहु घोलप, हेमंत निबांळकर, किरण रायसोनी, अमोल बंडगर, अजिनाथ बंडगर किरण कांबळे, कपिल शिंदे, योगेश चव्हाण, अस्लम मुलाणी, पिंटु वाळके, दिपक शिंदे, कुडलिक धुमाळ, विजयकुमार गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुरोगामी विचाराच्या शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर सर्वांना बरोबर घेऊन चालणारे महाराष्ट्राचे लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या बालेकिल्ल्यात येऊन आम्हाला सुळे नाही तर शरद पवार यांना संपवायचे आहे, असे विधान काही दिवसांपूर्वी भाजप नेत्याने केल्याने हा भाजपने आखलेला डाव सर्वसामान्य जनता कधी पूर्ण होऊ देणार नाही.
याउलट जनतेचा स्वाभिमान जागृत होऊन सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे. यामुळे सर्व पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन शंभर टक्के मतदान होईल, या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवणे महत्वाचे असल्याचे मत राज राजापूरकर यांनी व्यक्त केले.