दौंड : जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविलेले पाणी पूर्वेकडे तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत सुर्वे समितीचा अहवाल सादर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, त्यासाठी आवश्यक अहवाल संबधित विभागाने तयार करावेत असे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
दौंड तालुक्याशी निगडीत जलसंपदा विभागाच्या विषयांबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या जलसिंचन योजनांच्याबाबत मंत्री विखे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली. यावेळी जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतरण करणे व अस्तरीकरण करणे या कामासाठी सुमारे ४३८.४८ कोटी रुपयांच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल मंत्री विखे यांचे तालुक्याच्या वतीने सत्कार करीत आमदार कुल यांनी आभार मानले.
विखे म्हणाले की, खडकवासला ते फुरसुंगी बंदनळी कालवा कामासाठी राज्य शासनाकडून २२०० कोटी रुपये निधी मंजूर केला असून त्याचे कार्यारंभ आदेश दिला आहे. त्यासाठी आवश्यक पर्यावरण व वन विषयक मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे. तातडीने काम सुरु करण्याचे आदेशही दिले. जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) अस्तरीकरण व दुरुस्तीसाठी १८० कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर केले असून त्याची सुरु असलेली कामे गतिमान करावीत व शेतकऱ्यांच्या आवर्तनावर परिणाम होणार नाही याची देखील काळजी घावी, अशा सूचनाही केल्या आहेत. यावेळी अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कार्यकारी संचालक अतुल कोपोले, प्रकल्प समन्वयक संजय बेलसरे, मुख्य अभियंता हनुमंत गुनाले, हनुमंत धुमाळ, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या मौजे कुपटेवाडी, (ता. दौंड) येथील वितरिकेच्या वरील बाजूस वंचित भागाच्या सिंचनासाठी नवीन पाईपलाईन करणेसाठी सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे १७.४३ लाख निधी उपलब्ध झाला असून, पुढील महिनाभरात सर्वेक्षण पूर्ण करावे तसेच नव्याने समविष्ट करायचे तलाव समाविष्ट करून जास्तीत जास्त वंचित भागाला पाणी द्यावे अशा सूचना केल्या.
चिबड, खारवट व पाणथळ शेतजमिनी निर्मूलनासाठी धोरण ठरविणे कार्यवाही सुरु असून, वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेनंतर याबाबत प्रस्तावांना मान्यता देणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
दौंड (जि. पुणे) तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅंक वॉटर क्षेत्रात नवीन बॅरेजेस बांधणेसाठी सुधारित धोरण ठरविण्याची मागणी केली आमदार राहुल कुल यांनी केली असुन त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून, यामुळे दौंड, शिरूर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा परिसरातील शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार असल्याने त्यावर तातडीने कार्यवाही करावी असे आदेश मंत्री विखे पाटील यांनी दिले. मुळा मुठा व भीमा नदीवर अस्तित्वातील सर्वच बंधारे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांना मान्यता द्यावी, असे आदेश मंत्री विखे पाटील यांनी दिले.
वंचित भागाला पाणी द्यावे
पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या मौजे कुपटेवाडी, (ता. दौंड, जि. पुणे) येथील वितरिकेच्या वरील बाजूस वंचित भागाच्या सिंचनासाठी नवीन पाइपलाइन करणेसाठी सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे १७.४३ लक्ष निधी उपलब्ध झाला असून, पुढील महिनाभरात सर्वेक्षण पूर्ण करावे तसेच नव्याने समविष्ट करायचे तलाव समाविष्ट करून जास्तीत जास्त वंचित भागाला पाणी देण्यात यावे अशा सूचना केल्या .
चिबड, खारवट व पाणथळ शेतजमिनी निर्मुलन करण्यासाठी दौंड तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण करून प्रस्ताव सादर करून त्यास मान्यता मिळण्यासाठी मापदंड मंजुरीसाठी आवश्यक कार्यवाही शासन स्तरावर सुरु असून, वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेनंतर याबाबत प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार आहे.
नवीन बॅरेजेससाठी समितीची स्थापना
दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅंक वॉटर क्षेत्रात नवीन बॅरेजेस बांधणेसाठी सुधारित धोरण ठरविण्याची मागणी केली आमदार राहुल कुल यांनी केली असून त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून, यामुळे दौंड, शिरूर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा परिसरातील शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार असल्याने त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश मंत्री विखे पाटील यांनी दिले.