दिवे -गेले आठ ते नऊ महिने संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या करोनाने जवळ जवळ 95 टक्के देशांत फैलाव केला आहे.नागरिकांना जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. देश आणि मोठेमोठी शहरे एकाच वेळी बंद होतील असे स्वप्नही कधी न पाहिलेल्या जगाला चार महिने बाहेर फिरकूही दिले नाही. आत्ता पुन्हा दिवाळीनंतर दुसरी लाट घेऊन करोना कामावर रूजू झाला आहे, अशी चर्चा जिल्हाभर रंगली आहे.
गेली आठ महिन्यात नागरिकांनी जे काही भोगले ते साधे आठवले तरी डोळयासमोर भयाचे चित्र उभे राहते. परंतू सध्या बरेच नागरीक या सर्व गोष्टी विसरले की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
कारण नागरीक एवढे निष्काळजीपणाने वावरत आहेत कि मागील आठवणींना उजाळा दिला जाणार का? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतू त्याहीपेक्षा वाईट परिणाम आता जर का दुसरी लाट आली तर वाईट अवस्था होईल हे सर्व जाणकार व नेते मंडळी सांगत असताना देखिल बरेच नागरीक संभ्रमात पडले आहेत.
आता परत लॉकडाऊनचा काळ येणार का? आणि आलाच तर काय अवस्था होईल? परंतू त्याहीपेक्षा अधिक विचार करावा लागणार आहे. कित्येक नागरिकांना याची जाणीव व भिंती नसल्याचे स्पष्ट होत आहे. बरेच नागरीक नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून येत आहे. स्वत:बरोबर इतर नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचेच जाणवत आहे
धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय
दुसऱ्या लाटेमुळे सध्या नागरीक भयभीत झाले आहेत. नागरीकांची अवस्था धरलं तर चावतंय अन् सोडले तर पळतंय या म्हणीप्रमाणे झाली असून नागरीक सैरभर झाल्याचेही दिसून येते आहे. नागरीकांमध्ये या करोना संसर्गाची भिंती तर आहेच परंतु पोटापाण्याचा सर्वात मोठा प्रश्न असून तो कसा सोडवावा यासाठी धडपडत आसला तरी पण नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या सर्व नागरीकांना यांचे परिणाम भोगावे लागणार असून हे पाळत नसल्यानेच कोराणा परत एकदा मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याचे सांगितले जात आहे.