राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे) : खेड तालुक्यातील दीड टीएमसी पाणी साठा असलेले तिसरे धरण कळमोडी आज रविवारी सकाळी साडेपाच वाजता १०० टक्के भरले आहे. धरणातून सुमारे २०० पेक्षा जास्त क्यूसेस वेगाने पाणी आरळा नदीत सांडव्यावरून खाली पडत आहेत .चास कमान धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे.
खेड तालुक्यातील कळमोडी, चासकमान, भामा आसखेड ही तीन धरणे आहेत पैकी कळमोडी धरण आज (दि.२१) रोजी पहाटे साडेपाच वाजता १०० भरले. १०० टक्के भरणारे पुणे जिल्ह्यातील हे पहिले धरण आहे. सन २०२२ मध्ये कळमोडी धरण ११ जुलै २०२२ रोजी १०० टक्के भरले होते, तर मागील वर्षी सन २०२३ मध्ये ते १८ जुलै २०२३ या दिवशी शंभर टक्के भरले होते.
कळमोडी धरणात सन २०१० पासून पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणास कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाहीत. धरण भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहते. कळमोडी धरण परिसरात गेली आठ दिवस पाऊस पडत असल्याने धरण भरले. कळमोडी धरणावरून पाणी खाली असलेल्या चासकमान धरणाच्या जाते त्यामुळे पाणीसाठ्यात आता वेगाने वाढ होणार आहे.
कळमोडी धरणावर सहाय्यक अभियंता श्री पवार, सहाय्यक अभियंता शुभम सुसुंदरें, कर्मचारी रोहिदास नाईकडे, संभाजी बोंबले, शांताराम सातपुते चोवीस तास लक्ष ठेवून आहेत. कळमोडी धरण भरल्याने कळमोडीचे चिखलगावचे माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे माजी सरपंच हरिभाऊ गोपाळे, गणपत गोपाळे, माजी सदस्य दत्तात्रय गोपाळे तंटामुक्ती समितीचे सदाशिव शेलार यांनी समाधान व्यक्त केले.
खेड तालुक्यातील भामा आसखेड चास कमान व कळमोडी धरण क्षेत्रात झालेला पाऊस धरणातील पाणी पाणी पातळी टक्केवारी पुढील प्रमाणे