रेडा (प्रतिनिधी) – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण क्षेत्राचे पंचनामे करण्यात यावेत, दिवाळीपूर्वी शेतकरी व घरांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना शासनाकडून नुकसानीची आर्थिक मदत मिळावी तसेच अतिवृष्टीमुळे शेतमजूरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना मोफत धान्य वाटप करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.
राज्यात अतिवृष्टीने सर्वात जास्त नुकसान जिल्ह्यात झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांची शनिवारी सायंकाळी भेट घेत चर्चा केली.
यावेळी गावोगावच्या शेतमजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यात यावे, परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या कामगारांची योग्य ती नोंद जिल्हाधिकारी व अपर कामगार आयुक्तांकडे ठेवण्यात यावी, आदी मागण्यांही करण्यात आल्या आहेत.
सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी खासदार गिरीश ापट, माजी मंत्री संजय भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार बाबुराव पाचर्णे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आप्पासाहे जगदाळे, रवींद्र भेगडे, धर्मेंद्र खांडरे, पदाधिकारी उपस्थित होते. या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.