राजगुरूनगर(प्रतिनिधी): राजगुरूनगर शहरामध्ये सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या १५ दुकानांवर गुन्हा व विनाकारण रस्त्यावर दुचाकीवरून फिरणाऱ्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली.
देशात संचारबंदी लागू करण्यात आली असून आज सहावा दिवस आहे. करोना विषाणू फैलावत असताना नागरिक मात्र बेजबाबदारपणे वागत आहेत अनेक जीवनावश्यक वस्तू मिळणारी दुकाने सूरी आहेत. असे असताना नागरिक सेल्फ डिफरन्स व दुकानात सोशल डिस्टन्स अजिबात पाळत नसल्याने आजार बाळावण्याची भीती निर्माण झाली आहे.
खेड पोलीस आणि खेड प्रशासनाकडून नागरिकांना दुकानदारांना वारंवार सूचना करूनही ते ऐकत नसल्याने पोलिसांनी यापूर्वी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना चोप दिला होता.तरीही नियमांचे पालन केले जात नसल्याने पोलिसांनी आजपासून कडक भूमिका घेतली आहे. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी त्यांच्या पथकाने शहरातील वाडा रोड वरील श्री मार्ट सह सुमारे 15 दुकांदारांवर सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यावर भा. द. वि. 188, राष्टीय आपत्ती वयवस्थापन कायदा कलम 51 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. यासह विनाकारण फिरणा-यांच्या ७ मोटरसायकल जप्त केल्याआहेत.