– मधुकर गलांडे
बिजवडी : पुणे जिल्हयाच्या सीमेवर असलेले उजनी धरण ११० टक्के % भरले होते, काल पासून भिमा नदीत विसर्ग होत असल्याने पाणी साठ्यावर नियंत्रण ठेवून पूरपरस्थिती येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
उजनीतून 16 दरवाज्यातून 25 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा तसेच सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे अवाहन उजनीच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
आता उजनीमधून 16 दरवाज्यासह सिनामाढा 148 क्यूसेक, दहिगाव 63 क्यूसेक, बोगदा 150 क्यूसेक, मुख्यकालवा 650 क्यूसेक पाणी सोडले जात आहे.
पुणे आणि धरणसाखळी क्षेत्रात पावसाने चांगलीच मुसंडी मारल्याने भीमा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग येत आहे. मात्र उजनी परिसर आणि इंदापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरीही उजनी धरण भीमा खोऱ्यातील पावसावर 109.68 टक्के भरले आहे.