पुणे : भारती विदयापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा कुऱ्हाड व तलवारीने सपासप वार करुन खून करण्यात आला होता. या गुन्हयातील चार अल्पवयीन आरोपींसह सात जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी 48 तासात ताब्यात घेतले. पुर्व वैमनस्यातून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
सचिन तानाजी वसाघमारे(22,रा.आंबेगाव पठार), सोमनाथ दत्तात्रय गाडे (25,रा.आंबेगाव पठार), तुषार जालिंदर सरोदे(25,रा.कात्रज) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांनी संग्राम गुलाब लेकावळे(19) याचा बुधवारी रात्री गणराज चौकाजवळ कुऱ्हाड, तलवार आणी काठ्यांनी वार करुन खून केला होता.
या गुन्हयाचा तपास सुरु असताना तपास पथकातील अंमलदार शिवदत्त गायकवाड व प्रणव संकपाळ यांना अल्पवयीन असलेले चार आरोपी पुणे रेल्वे स्थानकावरुन बाहेरगावी पळून जाणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार पोलीस पथकाने पुणे रेल्वे स्टेशन परिसर पिंजून काढला असता, त्यांना चौघे आरोपी दिसले. त्यांनी आरोपींच्या दिशेने धाव घेताच ते पळून जाऊ लागले. मात्र त्यांना पाठलाग करुन थोड्याच अंतरावर पकडण्यात आले. त्यांना त्याब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी सचिन, सोमनाथ व तुषार यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे सांगितले. त्यानूसार या तिघांनाही अटक करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रकाश पासलकर, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, सचिन धामणे, उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रविंद्र भोसले, श्रीधर पाटील, संतोष भापकर, गणेश सुतार, प्रणव संकपाळ, सर्फराज देशमुख, सचिन पवार, आकाश फासगे, निलेश खोमणे, समिर बागशिरास विजय कुंभारकर, शिवदत्ता गायकवाड, जगदीश खेडकर, हर्षल शिंदे, राहुल तांबे, अभिजित जाधव, विक्रम सावंत, संतोष खताळ, प्रकाश टापरे व रविंद्र बोरुडे यांच्या पथकाने केली.