पुणे –प्रेमविवाह केला. पण, वैचारिक मतभेदांमुळे दोन वर्षांपासून हे वेगळे राहणाऱ्या दाम्पत्याचा घटस्फोट अवघ्या 9 दिवसांत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी घटस्फोट मंजूर केला आहे. दोघांनी ऍड. आकाश सुधीर चव्हाण आणि ऍड. खय्युम नय्युम सय्यद यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने अर्ज केला होता. गौतम आणि गौतमी (नावे बदलली) अशी त्या दोघांची नावे आहेत. मे 2019 मध्ये त्यांचा प्रेमविवाह झाला होता. जानेवारी 2020 पासून ते वेगळे राहत होते. त्यांना मूलबाळ नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार सहा महिन्यांचा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदारांच्या वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.
प्रेमविवाह योग्य, की नाही हे सांगणे कठीण आहे. नात्यात समजूतदारपणा हवा. या प्रकरणात परिस्थिती पाहता दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याने वेळ, पैशांची बचत आणि मानसिक त्रासातून सुटका झाली आहे. – ऍड. आकाश सुधीर चव्हाण, ऍड. खय्युम नय्युम सय्यद, अर्जदारांचे वकील