पुणे – करोना संसर्गामुळे शहरात सोमवारपासून पुन्हा संचारबंदी लागू करण्यात झाली आहे. त्यामुळे दररोज सायंकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांना विनाकारण भटकंती करता येणार नाही.
अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर फिरणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या आणि साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
त्यामुळे “नागरिकांनो, घरातच बसा. भटकंती करू नका, अन्यथा दंडात्मक कारवाई करू,’ असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नाकाबंदीदरम्यान बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.