पुणे (प्रतिनिधी) – परप्रांतातून आलेल्या नागरिकांना व कष्टकऱ्यांना प्रत्येक राज्यात 15 जून पर्यंत मोफत वाहनव्यवस्था करुन पोहचविण्याची व्यवस्था करावी, स्थलांतरित मजुरांना 17 मे पर्यंत पुर्ण वेतन द्यावे, प्रत्येक नागरिकांना प्रतिव्यक्ती 15 किलो धान्य (डाळी, तेलासह) द्यावेत, श्रम कायद्याचे पुर्णपणे पालन करुन कुठलाही श्रम कायदा रद्द करु नये, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे राज्य व केंद्रशासनाकडुन पालन करणे, लॉकडाउन काळात मुळगावी जाताना मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियाना 5 लाखाची भरपाई द्यावी, प्रत्येक गावागावात स्थानिक रोजगार निर्माण करुन प्रत्येक हाताला काम मिळावे या मागण्यासाठी जनआंदोलन राष्ट्रीय समन्वय याच्यांवतीने पुणे रेल्वे स्टेशनसमोर मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली मानवी साखळी करत आंदोलन करण्यात आले.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1229374960735540/