पुणे -अक्षय तृतीया आणि रमजान ईद गुरुवारी (दि.13) आहे. त्यामुळे आणि दोन दिवसांच्या बंदनंतर जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, भाजीपाला बाजार सोमवारी उघडल्यानंतर सकाळी खरेदीसाठी गर्दी झाली होती.
शहरात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने पाच दिवस सुरू ठेवण्याची मुभा आहे. शनिवारी आणि रविवारी दुकाने तसेच भाजीपाला बाजार बंद ठेवण्याचे आदेश आहेत. सोमवारी सकाळी शहरातील मध्यभाग तसेच नाना पेठेतील भुसार बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्यामुळे या भागात कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
शुक्रवारी अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद असल्याने सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
नाना पेठेतील भुसार बाजारात मोठ्या संख्येने मालवाहू वाहने आल्याने कोंडीत भर पडली. पुणे-सातारा रस्त्यावरील भापकर चौकात कोंडी झाली होती. शहरात करोनाचा संसर्ग काहीसा कमी झाला आहे.
पोलिसांनी अनावश्यक फिरणाऱ्याविरोधात कारवाईचा इशारा दिला असताना गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी अकराच्या सुमारास दुकाने बंद झाल्यानंतर मध्यभागात झालेली गर्दी ओसरली. त्यानंतर पोलिसांनी अनावश्यक फिरणाऱ्याविरोधात कारवाई सुरू केली.