पुणे,दि.10- नारायण पेठेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्यावर तक्रार देऊनही पोलीस दाद देत नाहीत. याचा मानसिक ताण येऊन मुलीच्या वडिलांचा ह्दयविकाराने मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी मुलीचा शोध लागल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. यामुळे अखेर पोलिसांना दहा दिवसांत प्रकरणाचा तपास पुर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन कुटूंबाला द्यावे लागले.
नीलेश देशपांडे (45,रा.नारायण पेठ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मृत्यू रविवारी झाला. त्यांची मुलगी एप्रिल महिण्यात बेपत्ता झाली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीच्या कुटूंबियांनी संशयीत आरोपीची माहिती पोलिसांनी दिली. संशयीत आरोपी घरी मिळून आला नाही.
दरम्यान नीलेश देशपांडे हे सातत्याने पोलिसांकडे तपासाबाबत माहिती घेत होते. ते शनिवारी उपायुक्त प्रियंका नारनवरे यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र कोविडमुळे त्यांना भेट नाकारण्यात आली. यामुळे त्यांनी सोमवारी अतिरीक्त पोलीस आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एक अर्जही तयार ठेवला होता. मात्र सतत तणावात राहिल्याने देशपांडे यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृतदेह ताब्या न घेण्याचा कुटूबांनी निर्णय घेतल्यावर संशयीत आरोपीच्या घरच्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
आरोपीचा शोध युध्दपातळीवर सुरु आहे. आमचे एक पथक सतत त्याच्या मागावर आहे. यामुळे आरोपी लवकरच ताब्यात येईल अीा माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोले यांनी दिली.