पुणे – राज्यातील जालना आणि सातारा जिल्ह्यातील करोना बाधित दर सर्वाधिक आहे. मंगळवारी (दि.18) जालना जिल्ह्याचा बाधित दर 36.85 तर सातारा जिल्ह्याचा 32.77 होता. तर सर्वांत कमी बाधित दर नंदुरबार येथे 3.82 टक्के आहे. राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा हा 22व्या स्थानावर आहे. पुण्यातील बाधित दर 14.58 टक्के असून, सलग तीन दिवसांपासून हा दर कमी होत आहे.
पुणे जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट फेब्रुवारी 2021 पासून सुरू झाली. मार्च आणि एप्रिल महिन्यात जिल्ह्यात बाधित दर चढता होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून काही जिल्हे वगळता पुणे जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, औरंगाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यातील बाधित दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
तर दुसरीकडे जालना, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातील बाधित दर वाढतो आहे. जालना जिल्ह्यात कमी झालेला बाधित दर पुन्हा वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी 20 टक्के असलेला दर अवघ्या 24 तासांत 36 टक्क्यांवर पोहचला आहे. सातारा जिल्हा बाधित दरात राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे.
राज्यातील बाधित दर टक्क्यांत (दि.18 मे)
जालना – 36.85, सातारा – 32.77, सिंधुदुर्ग – 26.9, अकोला – 27.5, बीड – 24.29, अमरावती आणि रत्नागिरी – 21, हिंगोली – 20.16, कोल्हापूर 19.13, पालघर 18.28, रायगड – 18.59, अहमदनगर 16.76, नाशिक 16.2, उस्मानाबाद 15.69, पुणे 14.58, लातूर 14.25, बुलढाणा 12.80, सोलापूर – 11.54, गडचिरोली – 11.36, वर्धा आणि वाशीम – 11, सांगली 10.72, ठाणे – 9.47, नागपूर 9.10, यवतमाळ आणि चंद्रपूर – 9.7, परभणी 8.57, नांदेड 8.51, धुळे 8.5, औरंगाबाद 7.45, मुबई 6.55, जळगाव 6.24, गोंदिया – 5.22, भंडारा 4.1, नंदुरबार – 3.82.