पुणे –शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत 1.67 टीएमसी इतका कमी पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये एकूण 13.10 टीएमसी म्हणजे 45 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
सद्यस्थितीत खडकवासला कालव्यातून 1 हजार 100 क्युसेकने शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. यामुळे सुमारे 60 हजार एकर शेतीला सिंचनासाठी पाणी मिळते. खडकवासला धरणात 0.85 टीएमसी, पानशेतमध्ये 5.61 टीएमसी, वरसगावमध्ये 6.17 टीएमसी आणि टेमघरमध्ये 0.48 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवशी खडकवासला प्रकल्पात 14.77 टीएमसी म्हणजे 51 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. वाढत्या उन्हामुळे होणारे बाष्पीभवन, शेतीला व पिण्यासाठी पाण्याची मागणीचा विचार करून
पाटबंधारे विभागाला नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.