करोनाच्या पार्श्वभूमीवर पासवाल्यांनाच फळ, भाजीपाला विभागात देण्यात येत आहे प्रवेश
पुणे(प्रतिनिधी) – मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभाग नुकताच सुरू झाला आहे. बाजारा गर्दी होऊ नये, यासाठी केवळ परवानाधारक खरेदीदारांना प्रवेश देण्यात येत आहे. ज्यांच्याकडे परवाना नाही, त्यांना तो काढावा लागणार आहे. मंगळवारी (दि.2) तब्बल एक हजार खरेदीदारांना परवाना देण्यात आला.
पहिल्याच दिवशी (31 मे) सुमारे 510 खरेदीदारांना, दुसऱ्या दिवशी सोमवारी 1 मे रोजी 500 जणांना बाजार समिती प्रशासनाच्या वतीने मागणीनुसार पास देण्यात आला. 10 एप्रिलपूर्वी सुमारे 1 हजार 310 जणांना बाजार प्रवेश करण्यास परवानगी देणारे ओळखपत्र यापूर्वीच देण्यात आलेले आहे. पहाटे 5 ते दुपारी 12 या वेळेतच खरेदीदारांना खरेदी करता येणार आहे.
आजपासून (मंगळवार) पूर्ण क्षमतेनुसार मार्केट यार्डातील व्यापार सुरू झाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, प्रवेशद्वारावर थर्मलने तापमान मोजण्याच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेतच. मात्र, मार्केट यार्डात फळ, भाजीपाला विभागात नेहमी गर्दी होत असते. ती कमी करून सोशल डिस्टनिंग पाळले जावे, किरकोळ खरेदीदारांनी खरेदीसाठी येऊ नये, यासाठी बाजार समितीने नियम केले आहेत. केवळ अधिकृत आडत्यालाच व्यापार करता येणार आहे.
त्याप्रमाणे अनुज्ञाप्तीधारकाल बाजारातील शेतीमालाची खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पास आहे, अशाच लोकांन पाहणी करून खरेदीसाठी सोडण्यात येत होते. मात्र, ज्यांच्यकडे पास नाही, त्यांना पास काढण्याची मुबा देण्यात आली आहे. दोन दिवसात उर्वरित खरेदीदारांनी पास काढून घेण्याचे आवाहन प्रशासा बी.जे.देशमुख यांनी केले आहे. त्यानुसार खरेदीदार मोठ्या संख्येने पास काढत आहेत.