नवी दिल्ली – कर्मचाऱ्यांच्या पूर्ण पगारावरून म्हणजे भत्यासह जो पूर्ण पगार दिला जातो, त्यावरून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत रक्कम घेतली जावी. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेत वाढ होईल, असे भारतीय मजदूर संघाने म्हटले आहे.
केंद्र सरकारने चर्चेसाठी पुढे केलेल्या कामगार संहितेमध्ये पगाराच्या व्याख्येत पूर्ण पगारामध्ये मूळ पगार 50 टक्क्यांपेक्षा कमी असू नये असे म्हटले आहे. सरकारच्या या प्रस्तावाला कंपन्याच्या संघटनानी अगोदरच विरोध जाहीर केला आहे. कामगार मंत्रालयाला दिलेल्या निवेदनात मजदूर संघाने म्हटले आहे की सर्व भत्त्यासह पूर्ण पगार विचारात घेऊन त्या आधारावर भविष्य निर्वाह निधीसाठी रक्कम कापली जावी.
भारतीय मजदूर संघाच्या या सूचनेस इतर कामगार संघटनांनी सहमती दर्शविली असली तरी प्रत्यक्षात औपचारीक मागणी केलेली नाही. सध्या मूळ पगाराच्या 12 टक्के एवढे योगदान कर्मचारी आणि कंपनी भविष्य निर्वाह करते. त्यामुळे मूळ पगार कमी दाखवून इतर भत्ते वाढविण्याचा कंपन्या प्रयत्न करतात.