नगर (प्रतिनिधी)-महामारीच्या संकट काळात निस्वार्थ भावनेने मानधन न घेता पोलीस दल व आरोग्य सेवेच्या मदतीसाठी उभे राहिलेले माजी सैनिकांना 50 लाखांचा विमा संरक्षण देऊन त्यांना शासनाच्या सेवेत समावून घेण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांना फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी व जनजागृतीसाठी स्वच्छेने माजी सैनिक आरोग्य विभाग व पोलीस दलाच्या मदतीला धावून आले आहेत. कुठलेही मानधन न मागता जीवाची परवा न करता ते सेवा देत आहेत. सीमेवर व संकट काळात देश रक्षणाचे कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेले, माजी सैनिक कोरोनाच्या संकट काळात देत असलेल्या सेवेच्या त्यागाची भूमिका लक्षात घेऊन माजी सैनिकांना शासनाने पोलीस दलात किंवा आरोग्य विभागात सन्मानाने सेवेत समावून घ्यावे अशी मागणी होत आहे.
फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, निवृती भाबड, जगन्नाथ जावळे, संतोष मगर, दिंगबर शेळके, संभाजी वांढेकर, विनोद परदेशी, संतोष शिंदे, गोपीनाथ डोंगरे, सहदेव घनवट, अशोक चौधर, प्रभाकर जगताप, ताराचंद गागरे, प्रकाश ठोकळ, शिवाजी गर्जे, रमेश जगताप, भाऊसाहेब रानमाळ, भारत खाकाळ, तैय्यब बेग, कुशल घुले, महादेव शिरसाठ, मनखुक वाबळे, चांगदेव पाचपुते, भानुदास पोखरकर, विजय गायकवाड आदिंसह प्रयत्नशील आहेत.