बापूराव सोलनकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बारामती : राज्यामध्ये “कोरोणा” चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याची सरकारवर वेळ आली आहे, अशातच शेळ्या – मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळ यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
राज्यातील मेंढपाळ पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, खानदेश या ठिकाणी व्यवसाया निमित्त मोठ्या प्रमात स्थलांतर केले आहे, आज कोरोणाचे संकट आल्यामुळे मेंढपाळ भयभीत झाले आहेत.
स्थलांतरित झालेले मेंढपाळ यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी किंवा आहे त्याच ठिकाणी त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करावी. तसेच ज्या गावात राहतात तेथील रेशन दुकानातून रेशन देण्यात यावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेंढपालांचे आरोग्य तपासणी करण्यात यावी, व तशा सूचना पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी यांना द्याव्यात अशी मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक बापूराव सोलनकर यांनी केली आहे.