कोलकाता: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये गढूळ राजकारण पाहायला मिळत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केले आहेत.
मोदी म्हणाले, आमचे सरकार ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पंचधातू पासून बनवलेला पुतळा त्याच जाग्यावर उभारून टीएमसीच्या गुंडाना उत्तर देणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान तृणमूल कांग्रेसच्या गुंडानी पुतळा तोडला आहे. हे काम ज्यांनी केले त्यांना कठोर शिक्षा द्यायला हवी.
यावर ममता बॅनर्जी यांनी मोदींवर पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या, बंगाल जवळ पुतळा बनवण्यासाठी पर्याप्त धन आहे. तुम्ही २०० वर्षांपूर्वीचा वारसा वापस करू शकता का? तसेच तुम्ही केलेले खोटे आरोप सिद्ध करा. नाहीतर तुम्हाला जेलपर्यंत घेऊन जाऊ. ममता बनर्जी एका जनसभेला संबोधत करत होत्या.
WB CM Mamata Banerjee in Mathurapur: Last night we came to know that BJP had filed a complaint with EC so that we can't hold any meeting after Narendra Modi's meeting. EC is brother of BJP, earlier it was an impartial body now everyone in the country says EC has sold out to BJP. pic.twitter.com/lWqXHJz6x5
— ANI (@ANI) May 16, 2019