मुंबई – देशाचे सर्वोत्कृष्ट पोलीस दल असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी केले. ते महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त गोरेगाव येथे राज्य पोलीसांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी कोश्यारी यांनी औपचारिक परेडची पाहणी केली तसेच राज्य पोलीस स्तंभाला देखील त्यांनी मानवंदना केली.
विजयस्तंभ अभिवादन सोहळा : विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा जागर
किनारपट्टीची सीमा आणि सायबर सुरक्षा, अंमली पदार्थांचा धोका आणि नक्षलवाद यांसारख्या येणाऱ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची साधने वापरली पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 2 जानेवारी 1961 रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राज्य पोलीस ध्वज सादर केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
राज्यपालांनी यावेळी करोना साथीच्या काळात डॉक्टर आणि परिचारिकांसह राज्य पोलीस कर्मचाऱ्यांनाही करोनायोद्धे असे संबोधित त्यांचे कौतुक केले. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, इतर वरिष्ठ सेवानिवृत्त व निवृत्त पोलीस अधिकारी, जवान आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. या वर्षी पोलीस बॅंड यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षणहोता, तर 46 कमांडोंच्या पथकाने याप्रसंगी सादर केलेले सायलेंट आर्म ड्रिल देखील अत्यंत आकर्षक होते. तसेच यावेळी पोलीस दलाच्या श्वान पथकानेही दमदार शो सादर केला.