अनेक नामवंतांना अटक, जंतर मंतरला कारागृहाचे स्वरूप
अहमदाबादमध्ये लाठीमार, दिल्लीत इंटरनेट सेवा खंडित
संपूर्ण देशात कॉंग्रेसची आणि डाव्या पक्षांची निदर्शने
दिल्लीत अभूतपूर्व वाहतूक कोंडी, धरपकडीचे सत्र सुरूच
नवी दिल्ली /लखनऊ : सुधारीत नागरिकत्व कायद्या विरोधात होणाऱ्या निदर्शनांना उत्तर प्रदेशात हिंसक वळण लागले. लखनऊमध्ये निदर्शकांनी पोलिस ठाणेच पेटवून दिले. शहरात अनेक वाहने पेटवण्यात आली. एक दूरचित्रवाणी वाहिनीची ओबी व्हॅन पेटवून देण्यात आली. परिवर्तन चौक येथे आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला चढवला. पोलिसांनी बेदम लाठीमार करून हिंसक आंदोलनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अनेक शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. उत्तर प्रदेशातील संभल येथे बसेस पेटवण्यात आल्या. तेथील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.
लखनऊमधील वातावरण हिंसक बनताच निदर्शनेही हिंसक बनली. हिंसक जमावाने रस्त्यातील मोटारी आणि अन्य वाहनांची मोडतोड सुरू केली. लखनऊ प्रेस क्लबमध्ये जमलेल्या पत्रकारांनीही हाच प्रकार अनुभवला. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला. पोलिसांना आव्हाने देत सुरू असलेल्या निदर्शनांमुळे लखनऊमधील रस्त्यांना युध्दभूमीचे स्वरूप आले होते.
देशातील विविध भागात होणारा हिंसाचार पाहता कोणत्याही निदर्शनांना परवानगी देण्यात येणार नाही. असे उत्तर प्रदेश पोलिसांनी बुधवारी स्पष्ट केले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यभर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते.
नवी दिल्लीत अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील शिक्षकांनी शांततापूर्ण निदर्शने केली. यात महिला शिक्षकांचा सहभाग मोठा होता. राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे 16 विमानांना उशीर झाल. तर इंडिगोने 19 विमने रद्द केली. भारती एअर टेलने मोबाईल सेवा खंडित केली. सरकारचा आदेश पाळणे हे आमचे कर्तव्य आहे, असे भारती एअर सेलचे सुनिल मित्तल यांनी सांगितले.
का कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात संपूर्ण देश आक्रोश करत आहे. प्रतिबंधात्मक आदेश घालून तुम्ही त्यांचा आवाज रोखू शकत नाही. प्रख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांना बंगळुरू येथे झालेल्या अटकेचा मी निषेध करते, असे प्रख्यात वित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री अपणर्अ सेन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायलयाने आंदोलक विद्यार्थ्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा देण्यास नकार दिला. त्यावेळी वकीलांनी न्यायलयातच निषेधाच्या घोषणा दिल्या. जंतर मंतर येथे मोठ्या संख्येने निदर्शक जमले. डी. राजा, सिताराम येचुरी, नीलोत्पल बसू, वृंदा कारत, कॉंग्रेसचे अजय माखन, संदीप दीक्षित, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव आणि उमर खलीद यांना अटक करण्यात आली.
आदोलकांचा आवाज दाबण्यासाठी सरकार निर्दयी कारवाई करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या, सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा जेवढा प्रयत्न करेल तेवढा तो आवाज मोठा होत जाईल. प्रत्येक भारतीयाला निदर्शने करण्याचा हक्क भाजपा हिरावून घेत आहे.
गुजरातमध्येही आंदोलनाला उग्र रूप आले आहे. अहमदाबाद मध्ये आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलकांनी पोलिसांची वाहने अडवल्यामुळे त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला, असे पोलिसांनी सांगितले.
प्रख्यात वकील प्रशांत भूषण आणि हर्ष मांडेर यांना अटक करण्यात आली. दिल्लीच्या आयटीओ भागात ही कारवाई करण्यात आली. कॉंग्रस नेते हरिश रावत आणि रिपूण बोरा यांनी आंदोलनात भाग घेतला. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने जोरदार निदर्शने केली. विधानसभेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने एकच गोंधळ उडाला.
अटक केलेल्या नामवंताची नावे
ेरामचंद्र गुहा, इतिहास कार, बंगळुरू
डी. राजा, नेते भाकप,
सिताराम येचुरी, अध्यक्ष माकप
नीलोत्पल बसू, नेते माकप
वृंदा कारत, नेत्या माकप
प्रशांत भूषण, वकील, नवी दिल्ली,
धर्मवीर गांधी, माजी खासदार, पतियाळा
संदीप दीक्षित, माजी खासदार, दिल्ली
योगेंद्र यादव, अध्यक्ष स्वराज भारत
कर्नल जयवीर, स्वराज्य भारतच्या दिल्ली शाखेचे अध्यक्ष
सुचेता डे, एआयसएच्या अध्यक्ष
उमर खालीद, युवा नेता
नदीम खान, नेता युनायटेड अगेन्स्ट हेटचे अध्यक्ष