शिक्रापूर -शिक्रापूर पोलीस हद्दीत महिला व युवतींवर अत्याचार होण्याचा पंधरा दिवसांत चार घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षितता रामभरोसे असल्याचे दिसून येते. आत्याचारी प्रवृत्तीला वेळीच वेसन घालले गरजेचे असून अन्यथा ही प्रवृत्ती अधिक बोकाळेल. ही प्रवृत्ती बोकाळून नये म्हणून पोलीस यंत्रणेसह नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे.
राज्यात महिलांवर अत्याचार होण्याचा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रांजणगाव येथे एका अभिनेत्रीचा विनयभंग झाल्याची घटना (दि. 6 फेब्रुवारी )रोजी घडली होती. कोरेगाव भीमा येथे एका महिलेवर बलात्काराच्या प्रयत्नाचा प्रकार (दि.8 फेब्रुवारी) रोजी घडला. त्यांनतर त्यास दिवशी एका सैनिकाने अल्पवयीन युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
(दि. 15 फेब्रुवारी) रोजी सणसवाडी येथे एका युवकाने युवतीवर बलात्कार केल्याची घटना घडली आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सणसवाडी येथील एका कंपनीच्या व्यवस्थापकाने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला असल्याची घटना घडली आहे.
महिलांवरती आत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिला घरात व बाहेर देखील सुरक्षित नाहीत. जोपर्यंत कडक कायदे करुन त्याची अंमलबजावणी होत नाही व पुरुषांच्या मानसिकतेत बदल होत नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार आहेत. पण महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे.
– सीमा पवार, सामाजिक कार्यकर्त्या
महिला व युवतींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आम्ही दामिनी पथक व निर्भया पथक कार्यान्वित केलेले आहे. लवकरच भरोसा सेल सुरू करणार असून या प्रकारांना नक्कीच आळा बसेल.
– ऐश्वर्या शर्मा, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी