नवी दिल्ली – मला हे समजत नाही,’हे कसले परराष्ट्र धोरण आहे.’ धर्मनिरपेक्ष देशही या मुद्द्यावर मौन बाळगून होते, मात्र काल संध्याकाळपासून अचानक सर्वजण सक्रिय झाले असून आता वक्तव्ये दिली जात आहेत. माझ्या सांगण्यावरून तुम्ही कोणतीही कारवाई का केली नाही? परक्या लोकांचा मुद्दा तुम्हाला कळतो आणि आमचे प्रश्न समजत नाहीत का?’ असं म्हणत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्याच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
ते पुढे म्हणाले,’भाजपने आपल्या दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्यास विलंब केला. आम्ही यापूर्वीही सांगितले आहे, परंतु कोणतीही कार्यवाही झाली नाही. हा प्रश्न अरब देशांमध्ये उपस्थित झाल्यावर कारवाई करण्यात आली. हा निर्णय 10 दिवसांपूर्वीच घ्यायला हवा होता. पैगंबरांवर वादग्रस्त विधाने केली जात आहेत. हरिद्वारमध्ये द्वेषपूर्ण भाषण झाले. नुपूर शर्माला तत्काळ अटक करायला हवी होती.’ अशी मागणीही त्यांनी केली .
दरम्यान,पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना भाजपने रविवारी (5 जून) निलंबित केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सहाय्यकाने पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे अरब देशांनी भारतातील हिंदूवादी राष्ट्रीय पक्ष भाजपच्या विरोधात बहिष्कार मोहीम सुरू केली. या बहिष्कारामुळे भाजपने घाबरून नूपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना निलंबित केल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टमध्ये केला जात आहे. यावरूनच ओवेसी यांनी माध्यमांशी बोलतांना मोदी सरकारवर टीका केली आहे .