कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत रंग भरायला लागले असले, तरी विकास हा मुख्य मुद्दा सोडून भावनिकतेच्या मुद्द्यांभोवतीच प्रचार फिरताना दिसत आहे. अर्थात प्रचाराचा हा पहिला टप्पा असला, तरी अजून कोणीच विकासाच्या मुद्द्यांना हात घातलेला दिसत नाही.
विकासाशी थेट निगडित असलेली ही विधानसभेची निवडणूक मूळ मुद्द्यांवर लढली जावी, हे अपेक्षित आहे, अशी सर्वसामान्य जनतेचीही भावना आहे.