पुणे – भारतीय नागरिक त्वासाठी सिंधी बांधवांचे 215 प्रस्ताव प्राप्त होते. त्यापैकी आजअखेर 136 जणांना नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे. प्रलंबित प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने पाठपुरावा करण्याचा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथे सिंधी बांधवांना भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते नागरिक त्व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक हिरानंद आसवानी उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशाच्या फाळणीमध्ये सिंधी समाजाने आपले सर्वस्व गमावले. परंतु खचून न जाता स्वत:च्या कर्तबगारीवर त्यांनी व्यापारात जम बसवला. पिंपरी- चिंचवडच्या प्रगतीमध्ये सिंधी समाजाचे मोठे योगदान आहे.
उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवडची राज्यभर ओळख आहे. पिंपरी- चिंचवडच्या आर्थिक उलाढालीमध्ये सिंधी समाजाचा मोठा वाटा आहे. अतिशय विनम्रपणे हा समाज राहतो. शहरातील नाग रिकांना, मूळ रहिवाशांना त्यांचा कधीच त्रास होत नाही.