‘ओम अंटावा’ फेम अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिची दक्षिण आणि उत्तरेतही जोरदार फॅन फॉलोइंग आहे. ‘पुष्पा: द राइज’नंतर अभिनेत्री अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. पण एका निर्मात्याचे म्हणणे आहे की, समंथाचे फिल्मी करिअर संपले आहे.
तिची कारकिर्दीत काहीच उरलेले नाही. समंथा रुथ प्रभू गेल्या काही वर्षांपासून अनेक अडचणीतून जात आहेत. नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटातून ती अद्याप सावरलेली नाही, त्याचदरम्यान ती मायोसिटिस नावाच्या आजाराला बळी पडली. यामुळे समंथा ला काही काळ अभिनयापासून दूर राहावे लागले. असे असूनही समंथा चित्रपट करत आहे.
समंथा रुथ प्रभूचा नुकताच शाकुंतलम थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे, ज्याचे खूप कौतुक होत आहे. समंथाच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. अशात दिग्गज निर्माता आणि दक्षिण चित्रपटांचे दिग्दर्शक त्रिपुरानेनी चिट्टीबाबू यांनी समंथाबाबत एक धक्कादायक गोष्ट सांगितली.
ते म्हणाले,’समंथाची चित्रपटांमधील कारकीर्द संपली आहे, आता तिला पुन्हा स्टारडम मिळू शकत नाही. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी समंथा आजारपनाचे कारण देत सहानुभूती मिळवत आहे. समंथाने यापुढे Sympathy घेऊ नये. ही अतिशय विचित्र आणि स्वस्त प्रसिद्धी आहे. असेही ते म्हणाले आहे. ‘समंथा ची कारकीर्द संपली, स्टारडम परत येणार नाही’ असं म्हणत त्रिपुरानेनी चिट्टी बाबू आपली भूमिका स्पष्ट केली आहे.