वाराणसी – उत्तरप्रदेश येथील सोनभद्र जमीन वादातील हिंसाचारानंतर प्रियांका गांधी आज या दुर्घटनेतील पीडित कुटूंबियांची भेट घेण्यासाठी गेल्या. यावेळी नारायणपूर येथे स्थानिक पोलिसांकडून प्रियांका गांधींना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत, प्रियांका गांधी यांनी सांगितले की, ‘उत्तर प्रदेश पोलिसांनी मला का ताब्यात घेतलंय, कुठं घेऊन जातायेत हेही मला माहिती नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे. मात्र प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आलेलं नाही तर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे, असं डीजीपींनी सांगितलं आहे.
दरम्यान, सोनभद्र या ठिकाणी जमिनीच्या वादातून १० जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गुरुवारी ही घटना घडली होती. याच प्रकरणात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी सोनभद्र या ठिकाणी आल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
Priyanka Gandhi Vadra in Narayanpur on if she has been arrested: Yes, we still won’t be cowed down. We were only going peacefully to meet victim families(of Sonbhadra firing case). I don’t know where are they taking me, we are ready to go anywhere.’ pic.twitter.com/q1bwkucl0g
— ANI UP (@ANINewsUP) July 19, 2019