वाराणसी : 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये ामचे सरकार आल्यास का आणि एनआरसी उखडून फेकू असे आश्वासन कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी दिले. उत्तर प्रदेशातलि प्रचाराचरे रणशिंग त्यांनी मोदी यांचा मतदार संग असणाऱ्या वाराणसीतून फुंकले.
सुधारीत नागरिकत्व कायदा (का) गा गरीबांच्या विरोधात आहे, यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. का हे केवळ अल्पसंक्यांच्याच नव्हे तर गरीबांच्याही विरोधातआहे,असे त्या म्हणाल्या.
का कयदा म्हणजे घटनेवर हल्ला असून भारतीय जनता पक्ष ठराविक समाजला लक्ष्य बनवून आपले राजकारण करत आहे. का आणि एनआरसी हे मुख्यत: देसातील गरीबांच्या विरोधात आहेत, असे त्या म्हणाल्या.
का आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलेल्या सर्वांना कॉंग्रेसच्या वतीने कायदेशीर मदत पुरवली जाईल, असे त्या म्हणाल्या. बनारस हिंदी विद्यापीठाच्युा विद्यार्थ्यांसह सुमारे 25 जणअंनी प्रियांका यांच भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या,असे कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव सरिता पटेल म्हणाल्या.