नवी दिल्ली – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यातही उत्तर प्रदेशातील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. येथे करोनामुळे अनेकांना प्राण गमवावा लागला. अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडं उपलब्ध होऊ न शकल्याने प्रयागराज जिल्ह्यात गंगा नदीच्या किनारी अनेक मृतदेह पुरण्यात आले होते. आता या मृतदेहांची अवहेलना सुरू झाली आहे. यावरून काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर चांगल्याच भडकल्या आहेत. तसेच त्यांनी एक व्हिडीओ शेअऱ करून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली.
प्रयागराजमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरण्यात आले आहेत. अजूनही दररोज नदी किनारी असलेल्या वाळूत मृतदेह पुरले जात आहेत. मृतदेह पुरले गेल्यानंतर त्याच्या चारही बाजूंनी बांबू लावण्यात येतात. जेणेकरून इतरांना समजावं. तसेच मतदेह पुरल्यानंतर त्यावर लाल वस्त्र टाकण्यात येते. तेच वस्त्र काढून घेण्याचं काम गंगा नदीवरील किनाऱ्यावर सुरू आहे. हे करतानाचा व्हिडीओ प्रियंका गांधी यांनी शेअर केला.
व्हिडीओ शेअऱ करून प्रियंका गांधी यांनी लिहिलं की, जिवंत असताना व्यवस्थित उपचार मिळत नाही, सन्मानाने अंत्यंसस्कार होत नाही. सरकारी आकड्यांमध्येही जागा मिळेना. आता स्मशानातून रामनामीही काढून घेण्यात येत आहे, असं म्हणत प्रियंका गांधींनी संताप व्यक्त केला आहे.
जीते जी ढंग से इलाज नहीं मिला। कितनों को सम्मान से अंतिम संस्कार नहीं मिला। सरकारी आंकड़ों में जगह नहीं मिली। अब कब्रों से रामनामी भी छीनी जा रही है।
छवि चमकाने की चिंता में दुबली होती सरकार पाप करने पर उतारू है। ये कौन सा सफाई अभियान है?
ये अनादर है-मृतक का, धर्म का, मानवता का pic.twitter.com/PHC1fyMKCL
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 25, 2021
दरम्यान प्रियंका गांधी यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक लोकांनी पाहिला आहे. तसेच त्यावर संतप्त प्रतिक्रिया देण्यात येत आहे.