नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (का) सध्या संपूर्ण देश पेटून उठला आहे. देशातील प्रत्येक शहरात निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी शांततेत, तर काही ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच बॉलिवूड कलाकारांनीही या कायद्याविरोधात आवाज उठवला आहे.दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा या कलाकारांनी कठोर शब्दात निषेध केला आहे.
— PRIYANKA (@priyankachopra) December 18, 2019
अभिनेत्री परिणिती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, जावेद अख्तर, विशाल भारद्वाज, फरहान अख्तर आणि अनुराग कश्यपने जामियाच्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराचा विरोध केला. यानंतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही ट्विटरच्या माध्यमातून या विषयावर आपले मत मांडले. तसेच जामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला.
शिक्षण प्रत्येक मुलाचे स्वप्न आहे. शिक्षणानेच त्यांना विचार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आपण त्यांना आवाज उठवण्यासाठी मोठे केले आहे. लोकशाही असलेल्या देशात शांतीप्रिय पद्धतीने उठवलेल्या आवाजाला हिंसेने उत्तर देणे चुकीचे आहे. प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे आणि उठणारा प्रत्येक आवाज भारताला बदलण्यासाठी सहाय्य करेल, असे ट्विट प्रियांकाने केले आहे.