मुंबई – निवडणुकीपूर्वी केलेल्या महायुतीला अपयश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या राजीनाम्यातून स्पष्ट सांगितले आहे. आता आपण कितीही फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला तरी आपले सरकार येणार नाही हे त्यांना कळले आहे, हेच त्यातून प्रतित होते, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
गेल्या पाच वर्षातफडणवीस सरकारने एकही पायाभूत काम केलेले नाही. 4 वर्षात राज्यात दुष्काळ पडला होता हे सांगत आपण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करु शकलेलो नाही, हे त्यांनी गेल्या पंधरा दिवसांत कबूल केले.
चार वर्षात राज्यात दुष्काळ होता तर त्यांनी याबाबत ठोस पावले टाकण्याऐवजी बुलेट ट्रेन आणि हायपरपूल करायला निघाले होते, अशा शब्दांत चव्हाण यांनी फडणवीस सरकारच्या कामगिरीवर टीकास्त्र सोडले.