कोलंबो – इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव तसेच भुवनेश्वर कुमार इंग्लंडला येत्या दोन दिवसांत रवाना होणार आहेत. तेथे भारताच्या प्रमुख संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही त्यांची प्रतीक्षा आहे.
हे खेळाडू दाखल झाल्यावर त्यांना किमान तीन दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागणार असून त्यानंतरच ते भारतीय संघाच्या सराव सत्रात सहभागी होऊ शकतील.
पृथ्वी आणि सूर्यकुमार इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याची अधिकृत घोषणा सोमवारी बीसीसीआयने केली.