बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. महत्वाचं म्हणजे मागील दीड वर्षापासून भारतीय संघात पुनरागमन न करू शकलेला युवा सलामीवीर पृथ्वी शॉ अखेर संघात परतला आहे. शुक्रवारी बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेव्यतिरिक्त, पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठीही संघाची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा | बाला रफिक शेखचा धक्कादायक पराभव; सिकंदर शेखने केले चितपट
भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय १५ जानेवारीला (रविवार) खेळला जाणार आहे. त्यानंतर १८ जानेवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. त्याचबरोबर २७ जानेवारीपासून तीन सामन्यांची टी-२० मालिकाही खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी केएल राहुल आणि अक्षर पटेल यांना कौटुंबिक कारणांमुळे विश्रांती देण्यात आली आहे. याचा फायदा इतर खेळाडूंना मिळणार आहे.
मोठी बातमी! भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झा घेणार निवृत्ती; पोस्ट शेअर करत दिली माहिती
पृथ्वीचे दीड वर्षानंतर पुनरागमन
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे, युवा खेळाडू पृथ्वी शॉचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याने जुलै २०२१ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर पृथ्वीने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, मात्र तो सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तेव्हापासून तो भारताच्या टी-२० संघात परतलाच नाही. दरम्यानच्या काळात पृथ्वीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दामदार कामगिरी केलेली आहे. अलीकडेच त्याने आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात ३७९ धावा करून मोठा विक्रम मोडीत काढला.
भारताचा टी-२० संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, शिवम मलिक, युवराज मलिक, मुकेश कुमार.