मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि बांगलादेश हे दोन संघ पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे हा क्रिकेट सामना भारतासाठी ऐतिहासिक असणार आहे. भारत- बांगलादेश सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली आहे.
दरम्यान, या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. या सामन्याला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित राहणार आहे.
तर हा सामना पाहण्यासाठी बीसीसीआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आमंत्रण पाठवले आहे. या आमंत्रणाला आता मान देऊन मोदी सामना पाहायला येतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.