नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांची चांगलीच शाळा घेतली असल्याचे समोर आले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी सर्व खासदारांनी रोज संसदेत हजेरी लावण्यासाठी सक्त ताकीद दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी खासदारांना “जर तुम्ही स्वत:मध्ये बदल केले नाहीत, तर भविष्यात योग्यवेळी बदल केले जातील,” असा इशाराही दिल्याचे सांगण्यात येत आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे. “संसदेतील अधिवेशन आणि बैठकींना नेहमी उपस्थित राहा. मला वारंवार तुम्हाला लहान मुलांप्रमाणे हे सांगावं लागणं चांगली गोष्ट नाही. जर तुम्ही स्वत:मध्ये बदल केले नाहीत, तर भविष्यात बदल केले जातील,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
We explained why they had to be suspended. The country has witnessed whatever took place. It’s on record. If they apologise even today, we’re ready to withdraw the suspension: Union Parliamentary Affairs Min Pralhad Joshi after BJP Parliamentary Party meet on suspended 12 RS MPs pic.twitter.com/sjEhsjTeDW
— ANI (@ANI) December 7, 2021
नागालँडमधील मोन जिल्ह्यात रविवारी सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये सहा खाण कामगारांसह १४ नागरिकांचा मृत्यू झाला व ११ जण जबर जखमी झाले. जवानांनी गैरसमजातून मजुरांवर गोळीबार केला, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या दोन्ही सदनांत सोमवारी निवेदनाद्वारे दिली आहे. तर दुसरीकडे अधिवेशनाला सुरुवात होताच १२ खासदारांचे गेल्या अधिवेशनात घातलेल्या गदारोळामुळे निलंबन करण्यात आले आहे.
याशिवाय भाजपा आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही तयारी करत आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबसारख्या राज्यांचा समावेश असल्याने भाजपाने आत्तापासूनच कंबर कसली आहे.
Delhi: Union Ministers Pralhad Joshi, Jitendra Singh, Arjun Ram Meghwal and other BJP leaders arrive for the party’s Parliamentary Party meeting. pic.twitter.com/xwLJG6Xhzz
— ANI (@ANI) December 7, 2021
दरम्यान पंतप्रधान मोदींनी बैठकीत संसद खेळ स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्याचे आवाहन केले. यासोबत ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे त्यांच्यासोबत लाईव्ह कार्यक्रम करण्याचे आवाहनही केले असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
यावेळी त्यांनी खासदारांच्या निलंबनावर बोलताना आम्ही यामागील कारण स्पष्ट सांगितले आहे. देशानेही जे काही झालं ते सर्व पाहिले आहे. जर त्यांनी आजही माफी मागितली तरी निलंबन मागे घेण्यास तयार आहोत असे सांगितले.